Tuesday, 23 December 2014

सावध पाऊल


एक कथा आहे.
प्रशांत, हा गेली पाच सहा वर्षे मुंबईत एका सॉफ़्टवेअर कंपनीत नोकरी करत असतो. लहानपणापासुन मुंबईसारख्या शहरातच वाढल्यामुळे त्याचा ग्रामीण जीवनाशी किंवा शेतीशी कधीही संबध आला नाही. पण कांही कारणाने त्याचा संबंध शेजारच्या खेडेगावांशी आला आणि तो शेतीच्या प्रेमात पडला. त्याने नाशिकच्या व्हिजीट मध्ये द्राक्षाची शेती पाहिली आणि त्याने स्वत: द्राक्षाची शेती करण्याचे ठरवले. स्वत:च्या शेतात पिकणारी खुपसारी द्राक्षे प्रोसेसिंग कंपनीला विकुन मोठा नफ़ा मिळवायचा असा त्याचा प्लॅन होता.
त्याने नोकरीतून साठलेल्या पैशाने छोटसे शेत विकत घेतले आणि द्राक्षाची रोपे लावली. पण झाले असे की शेतीतला कोणताही अनुभव नसल्यामुळे त्याला या प्रयत्नात खुप मोठा तोटा झाला. त्याचे हात नुकसानीमुळे होरपळुन गेले. तो आता म्हणु लागला की " शेती करणे ही आयडीयाच चुकिची आहे आणि कोणीही शेती करुन पैसा कमवू शकत नाही"
 
प्रशांतसारखेच आपल्यापैकीही खुपजणांनी स्वत:च्या लिमिटेड माहितीच्या जोरावर फ़ायनान्शियल मार्केटमध्ये पैसे गुंतवले. फ़ायनान्शीयल मार्केटचे वास्तविक ज्ञान नसल्यामूळे खुप सा-या अफ़वा आणि कटू कथा तयार झाल्या - " शहाण्याने . . . च्या मार्गाला जाउ नये" . . . इत्यादी इत्यादी. त्यामुळे झाले असे कि जास्तप्रमाणात लोक आता फ़क्त एकदोन प्रकारची गुंतवणुक साधने वापरतात. पण अशा गुंतवणुकीतून त्यांच्या गरजा पुर्ण होऊ शकत नाहीत. महागाईचा दर १०% च्या वर पोहचला असेल तर गुंतवणुकीवर कमीतकमी किती रिटर्नस मिळायला हवेत हे ही पाहणे गरजेचे आहे.
 
असो, तर कालांतराने प्रशांतने कांही तज्ञ लोकांनाचा सल्ला घेतला, कांही अनुभवी लोक कामगार म्हणुन ठेवले आणि त्याच शेतीतून द्राक्षाचे पिक घेतले. आज तो मुंबईतच राहतो आणि त्याची शेती नाशीकमध्ये द्राक्षातून लाखो रुपये कमवून देते.
त्याच प्रकारे योग्य सल्ला, काटेकोर नियोजन आणि अभ्यासपुर्वक केलेली गुंतवणुक फ़ायदा करते. कोणतीही गुंतवणुक करताना त्याची सर्वंकष माहीती करुन घेतली पाहीजे आणि योग्य त्या एक्स्पर्टसना भेटले पाहिजे. कारण कितीही यशस्वी खेळाडू असला तरी त्यालाही कोचची गरज असतेच.
 
A Thought for Today: Public opinion can't be a substitute for the Expert's View.

No comments:

Post a Comment