Saturday, 27 December 2014

व्यावसाईक दृष्टीकोण

 
Rich Dad Poor Dad या गाजलेल्या पुस्तकात छापलेली कथा -
एके काळी चारी बाजूनी सुंदर टेकड्यानी वेढलेले एक गाव होते. सुखसोई व समृध्दीने भरपुर गावात राहणारे नागरिक मोठ्या सुखाने आनंदात राहत होते. फ़क्त एकच अडचण होती ती म्हणजे पाणी. त्या गावातील प्रत्तेक कुटूंब त्रस्त होते ते एकाच गोष्टीने की त्याना पाण्यासाठी वणवण करत शेजारच्या टेकडीपलीकडे जावे लागायचे. गावातल्या बुजुर्ग लोकानी मिटिंग बोलावली आणि ठरवले की टेंडर काढायचे आणि कोणालातरी पाणी पुरविण्याचा ठेका द्यायचा. ठेकेदाराने गावाला दररोज पुरेल एवढे पाणी पुरवठा करायचा. यासाठी गावातूनच दोन निविदा आल्या आणि दोघानाही या कामाचा ठेका देण्यात आला. बुजुर्गाच्या निर्णयामागे एक गणित होते की दोघाना काम देण्यामुळे त्यांच्यात स्पर्धा वाढून दर आणि क्वालिटी टिकून राहील.
त्या दोघा ठेकेदारापैकी पहिला ठेकेदार त्याच दिवशी दुकानात जाउन दोन नवीन गॅल्व्हनाइज्ड बादल्या विकत घेउन आला आणि लगेचच पाणी आणण्याच्या कामाला लागला. त्याने दोन दोन बादल्या पाणी भरुन आणुन गावात बांधलेल्या पाण्याच्या हौदात ओतायला सुरुवातही केली. अशाप्रकारे लगेचच कमाई सुरु झाली. तो भल्या पहाटे उठुन आपल्या कामाला सुरवात करत असे जेणेकरुन जास्तित जास्त कमाई होऊ शकेल.
तो त्याच्या "हार्डवर्क"वर आणि होणा-या रोखीच्या कमाईवर जाम खुष होता.
तो दुसरा ठेकेदार कांही महीने गायबच होता. त्यामुळे पहीला खुष होता कारण सर्व कमाई त्यालाच मिळत असे.
दोन नवीन बादल्या विकत घेउन पहिल्याशी स्पर्धा करण्याऐवजी दुस-याने प्लॅन तयार केला, एक कंपनी स्थापन केली ज्यात चार इन्व्हेस्टर होते, कामगार होते आणि एक मॅनेजरही होता. सहाच महिण्यात तो परत आला आणि त्याने तळ्यातले पाणी मोठ्या पाइपमधुन थेट गावापर्यंत पोहचवले. आता पाणी फ़क्त साठवणीच्या हौदातच पडत नव्हते तर लोकांच्या घरी पोहचत होते, तेही पहिल्यापेक्शा शुध्द.
नवीन सिस्टिमच्या उद्घाटनावेळीच दुस-याने जाहीर केले की त्याचे पाणी आठवड्याचे सात दिवस चोविस तास सुरु राहील आणि जास्त शुध्द तरीही पहिल्यापेक्शा ७५% स्वस्त. मग काय लोकांनी आनंदोत्सवच साजरा केला. दुस-याची योजणा सफ़ल झाली.
पहिल्या ठेकेदाराने दुस-याशी स्पर्धा करण्यासाठी आपला दरही ७५% कमी केला. आणि होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी एकाचवेळी चार बकेट पाणी आणु लागला. आणि आपल्या दोघा मुलांनाही त्याने या कामात मदतीला घेतले. जेव्हा त्याची मुले कॉलेजला जाउ लागली तेव्हा त्याने त्यामुलांना सांगितले की लवकर परत या हाच बिझनेस तुम्हाला पुढे चालवायचा आहे.
मुले कॉलेजमधे रमली आणि पहिल्या ठेकेदाराला कामगारांचा तुटवडा भासू लागला. पगार थकू लागले. कामगार जास्त पगार मागु लागले आणि एकावेळी एकच बादली भरुन आणणार म्हणु लागले. अशाप्रकारे पहिल्याचा बिझनेस लडखडत राहिला. शेवटपर्यंत हार्डवर्क करण्याशिवाय पर्याय त्याच्याकडे नव्हता आणि लोकांची देणीही वाढली.
दुस-याने मात्र पाठोपाठ इतर गावांनाही पाणी पुरवठ्याच्या योजना कार्यान्वीत केल्या आणि पाण्यासारखा पैसा मिळविला. तो आता मजेत राहतो कारण त्याच्याकडे काम करण्यासाठी लोक नेमलेले आहेत. 

आता स्वत:ला प्रश्न विचारा:
1. आपण काय करत आहोत?
2. पाइपलाइन टाकत आहोत कि बादलीने पाणी भरत आहोत?
3. मी हार्डवर्क करतो की स्मार्टवर्क करतो ?
 
सर्वाना स्मार्ट वर्क करायचे आहे.
पण ते करु शकत नाहीत. कारण स्मार्ट डिसिजन घेण्यात रिस्क असते. बिझनेस सेट करण्यात सहा महिणे-वर्ष वाया जाईल असे वाटते म्हणुन सगळेजण दोन दोन बादल्यानी पाणी भरत आहेत. बिझनेस किंवा गुंतवणुक करण्यात आपण मागे पडतो कारण दोन्हीतही आपल्याला रिस्क वाटते. भले आयुष्यभर नोकरी करु पण कोणताही छोटासा बिझनेस करणार नाही किंवा गुंतवणुक करणार नाही.
 
पण मित्रानो, म्हणतात ना Risk शिवाय Reward नाही. शंभरातले ५% लोक रिस्क घेतात आणि श्रीमंत बनतात, बाकी ९५% काठावरच्या गप्पा हाणतात.

No comments:

Post a Comment