Saturday, 9 January 2016

रिटायरमेंट प्लॅनिंग

प्रिय मित्रांनो,
काही दिवसापुर्वी ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटपट्टूने आपली निव्रुत्ती जाहीर केली. मागच्या काही महिन्यातही आणखी एकाने रिटायरमेंट घेतली होती. ऐन पस्तीशीतल्या दोघांनीही यापुढे आपला पूर्णवेळ कुटुंबियाना देणार असल्याचे सांगितले. क्रिकेटमूळे सर्ववेळ ग्राउंडवर आणि प्रवासात जात असल्यामूळे मुलांच्या संगोपनात स्वत:चा वाटा ते निभाउ शकत नव्हते असे ते म्हणतात. आणि खरोखर ते तिशी-पस्तीशीत कामापासुन रिटायर होवू शकतात.

आपल्याकडेही आजकाल हाच ट्रेंड ऐकायला येतो की "मला लवकरच रिटायर व्हायचे आहे. आत्ता जास्त कष्ट करावे लागले तरी चालतील पण स्वत:च्या कुटुंबासोबत रिटायरमेंट लाईफ एंजोय करता आली पाहिजे "

याबरोबरच काहीवेळा रिटायरमेंट प्लॅन मधे गुंतवणूकसंबधी जाहिरातबाजीही ऐकायला मिळते की आजच आमच्याकडे गुंतवणूक करा आणि रिटायरमेंट एंजोय करा. परदेशात ट्रिपला जा. अमुकतमुक पेन्शन प्लॅनमध्ये पैसे गुंतवा नाहीतर म्हातारपणी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागेल. वगैरे वगैरे.

यातल्या काही गोष्टी खऱ्याही आहेत. ऑस्ट्रेलियाचे फक्त क्रिकेटपटूच नाही तर बहुतांश लोक कामापासुन लवकर रिटायर होवू शकतात याचे मुख्य कारण त्यांची रिटायरमेंट फंडातील गुंतवणूक होय. एका आकडेवारी नुसार ऑस्ट्रेलियाची रिटायरमेंट फंडातील गुंतवणूक हि ऑस्ट्रेलियाच्या GDP च्या १४६% आहे तर आपल्याकडे सगळीमिळून फक्त १३% पर्यंत आहे. आपल्याकडे रिटायरमेंट किंवा पेंशन फंडाकडे लोक दुर्लक्ष करतात यामागे बरीच कारणे आहेत. पहिले आणि मुख्य कारण म्हणजे त्याच्या गरजेविषयीची जागरुता. दुसरे कारण सर्वाना पटण्याजोगे आहे ते म्हणजे आपण सर्वजण ती जबाबदारी म्हातारपणी आपल्या मुलांवर सोपवत होतो आणि आपला सर्व पैसा, वेळ, प्रेम सर्वकाही मुलामध्ये गुंतवत होतो. मुलांचे शिक्षण, लग्न, घर-संसार उभा करतो. पण " हम दो हमारा एक " च्या काळात आपला मुलगा आपल्याला योग्य सन्मानाने सांभाळेल यांची गॅरंटी काय? दिवसेंदिवस वाढती महागाई, आर्थिक नियोजनाचा अभाव आणि इतर चैनीच्या वस्तूवर होणारा खर्च यातून तुमच्या मुलांचीही वाट "बिकट वाट वहिवाट " असे होणार आहे.

आणखी एक कारण म्हणजे Priorities आपल्याकडे लोक प्रथम प्रिओरिटी ही घराला देतात त्यामुळे पिढी दर पिढी प्रत्तेकाच्या कमाईचा मोठा हिस्सा हा नवीन घर बांधणे किंवा विकत घेणे यावर खर्च होतो. अनेकदा तर आयुष्यात फ़क्त घर हि एकमेवच गोष्ट उभी करता करता म्हातारे होतो. त्यानंतर नंबर लागतो तो सोन्याचा. लग्ने असोत वा बारसे भरमसाठ सोने खरेदी ठरलेलीच. त्यानंतरही दर वर्षी कांही ना कांही रक्कम हि सोने खरेदीवर खर्च होतेच.

अशा अनेक कारणानी स्वत:च्या रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याबाबत कधी विचारच होत नाही. त्यातच वाढत्या आरोग्य सुविधामुळे सरासरी वयोमानही वाढले आहे त्यामुळे म्हाताऱ्या लोकांचा चरितार्थाचा खर्च वाढता राहणार आहें.

अशा परिस्थितीत जर आपली रिटायरमेंट लाईफ़ मुलांच्यावर बोजा न बनता खरोखरच एन्जॉय करायची असेल, परदेशवारी, गोवा बीचवर जाउन धुम करायची असेल, आपल्या नातवांना वाढदिवसाच्या किमती गिफ़्ट द्यायच्या असतील तर हाती हक्काचा पैसा हवाच. त्यामुळे पेंशन प्लॅन हि काळाची गरज आहे.

आज आपल्यापैकी कितीजनानी यासंदर्भात विचार केला आहे ? आपल्या स्वत:चे टार्गेट सेट केले आहे का? आपल्याकडे ज्या उपलब्ध स्किम आणि रिटायरमेंट प्लॅन आहेत ते आपल्यासाठी योग्य आहेत का? जाहीराती फ़क्त भुलवणा-या तर नाहीत ना?

आपल्या सर्वासाठी मीच जरा एक कॅल्क्युलेशन मांडतो बघा पटतय का ?

आज एका सर्वसाधारण कुटुंबाचा एक महिण्याचा घरखर्च रु. ८,५००/- आहे. (यात अगदी कपडे खरेदी, सण समारंभ इ गोष्टी धरल्या नाहीत)

गेल्या ३५ वर्षाचा महागाई वाढीचा दर सरासरी ७.५० % होता. समजा इथुनपुढे महागाई दरवर्षी ७% ने वाढत असेल तर २० वर्षानंतर एका महिण्याचा खर्च असेल रु ३२,०००/-, २५ वर्षानी ४५,०००/- आणि ३० वर्षानंतर रु. ६३,५००/- प्रती महिना

पण हेच जर महागाई ९% ने वाढली तर ३० वर्षानी एका महिण्याचा फक्त घरखर्च असेल रु. १,१०, ५००/- ???? एक लाख दहा हजार पाचशे रुपये फक्त ??

शॉक बसला ??

आजचा मासिक खर्च
,५००/-
,५००/-
,५००/-
वार्षिक महागाई वाढ
%
%
%
२० वर्षानंतरचा मासिक खर्च
३२,०००/-
३८,८४१/-
४६,७००/-
२५ वर्षानंतरचा मासिक खर्च
४५,०००/-
५५,७३७/-
७१,८५०/-
३० वर्षानंतरचा मासिक खर्च
६३,५००/-
८३,८५५/-
,१०,५६४/-

आता हे पाहू कि एकाद्याला निदान घरखर्चाचे टेंशन सोडून सन्मानाने जगण्यासाठी नेमके किती रुपये लागतील ?

समजा आज एखाद्या वय वर्ष ३५ असणाऱ्या माणसाला ६० व्या वर्षी रिटायर व्हायचे आहे आणि तो पुढे ८० वर्षापर्यंत जगला तर त्याला रिटायरमेंटसाठी ७% महागाई दराने साधारणपणे १ कोटी रुपये लागतिल. तेच ८% महागाई दराने १ कोटी ३५ लाख रु आणि ९% महागाईने १ कोटी ७६ लाख रुपये लागतील. हे झाले एकुण लागणा-या रिटायरमेंट फंडाचे आकडे. जर कोणाला पेंशन किंवा रिटायरमेंट फंडात पैसे गुंतवायचे असल्यास काय कराल ? म्हणजेच जर २५ वर्षात १ कोटी रु जमवायचे तर कोठे गुंतवावेत ?


वार्षिक परतावा % रु १ कोटीसाठी कोटी ३५ लाख १ कोटी ७५ लाखसाठी
मासिक रिकरिंग ठेव
मुदत २५ वर्षे
मुदत २५ वर्षे
मुदत २५ वर्षे
% ने मासिक रिकरिंग
,०००/-
१२,०००/-
१५,६००/-
१२ % ने मासिक रिकरिंग
,३००/-
,२००/-
,३००/-
१५ % ने मासिक रिकरिंग
,०००/-
,२००/-
,४००/-

याचाच अर्थ २५ वर्षात १ कोटी रुपये जमा व्हायचे असतिल तर ९% ने रिटर्न्स असणार्या ठिकाणी ९ हजार रु ची मासिक रिकरिंग करावी लागेल. पण तेच १५ % वार्षिक रिटर्न्स असणाऱ्या ठिकाणी फक्त ३ हजारची मासिक रिकरिंग केली तरीही १ कोटी रु जमू शकतात. एकरक्कमी गुंतवायचे असल्यास ९% ने रिटर्न्स असणार्या ठिकाणी २५ वर्षासाठी रुपये ११ लाख ५० हजार तर १५ % वार्षिक रिटर्न्स असणाऱ्या ठिकाणी फक्त 3 लाख रुपये गुंतवावे लागतील.

मित्रानो, जाहिरातीना भुलू नका. आपले रिटायरमेंट प्लॅनिंग योग्य प्रकारे करा. आधी आपले टार्गेट सेट करा आणि तिथपर्यन्त पोहचवू शकणारेच वाहन निवडा.

Saturday, 2 January 2016

Common Mistakes in Personal Finance

Common Mistakes in Personal Finance
प्रिय मित्रांनो,
खालीलपैकी एक तरी चूक कधी ना कधी, कळत न कळत आपल्याकडून होत असते
१) गरजेशिवायचा अतिरिक्त खर्च करणे
हे तुमच्याकडुन नकळत होते. उदा. तुम्ही एक जाहीरात बघता 100 Megapixel चा कॅमेरा ज्यात 2000 पट optical zoom ची फ़ॅसिलिटी आहे. किमतीवर २०% सुट आणि ”मासिक सुलभ हप्त्यावर उपलब्ध” असे कळताच आपल्यातला फोटोग्राफ़र जागा होतो. किंवा ५२ इंची LED TV वर १५% डिस्काउंट, सोबत होमथिएटर फ़्री अशी जाहिरात बघताच आपल्याला जाणवू लागते कि आपली जूनी टिव्ही आता ब्लर दिसते आहे आणि तिला बदलायची वेळ आली आहे. मग काय अशी खरेदी नकळतच होवुन जाते.
(प्लिज इथे Financial Planning म्हणजे काहिंच खर्च न करणे असा घेउ नका. आपल्या स्वप्नांना आणि गरजाना योग्य न्याय देणे Financial Planning चाच एक भाग असते)

२) पत्नी आणि मुलासोबत आर्थिक नियोजनाबद्दल चर्चा न करणे
कुटुंबातील जवळपास सर्वाना कमवणा-याची कमाई माहीत असते पण खर्चाचा रकाणा कोण बघत नाही. विमा, होमलोनचे हप्ते, मुलांचे शिक्षण, लग्ने, रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आपण काय करता ते सर्वाना माहीत असावे. तेव्हा सर्वाना भविष्याच्या नियोजनात सामिल करुन घ्या.

३) गुंतवणुकीबाबत असमतोल असणे
कोणातरी एजंटच्या सांगण्यावरुन एखाद्या फ़ॉर्मवर सही केली की कांही लोकांचे टॅक्स प्लॅनिंग संपते. . . मग कालांतराने अशा लोकांच्या बॅंक खात्यात लाखो रुपये पडुन असतात. एफ़डीची मुदत संपली की नवीन करणे म्हणजेच आर्थिक नियोजन असे होवून बसते. शेवटी शेवटी कळते की शेअर मार्केटमधे फ़ायदा आहे. बघुया काय होते? असे म्हणुन १०-१५ हजार रु गुंतवायचे आणि १ वर्षात डब्बल व्हायची वाट बघायची. . .

याच्या विरुध्द कांही लोक ना बॅंकेत एफ़डी करतात ना पीपीएफ़ ते स्वत: शेअर ट्रेडींग करतात कधी यांची रक्कम १० वरुन १५ लाख होते तर कधी १५ वरुन ८ लाख, पुन्हा ८ वरुन १२ होते. असे करता करता कालांतराने तिथेच असतात.

गुंतवणुकीचा हिस्सा योग्य प्रमाणात ज्या ठिकाणी असायला हवा तिथे नसल्यामूळे दोघांचेही आर्थिक नियोजन फ़सते. योग्य सल्लागार निवडण्याचे टाळले की "चान्स" निघुन जातो.

४) जवळच्या लोकांकडुन येणा-या गोष्टी स्विकारणे
जर एखाद्या नकली वस्तू विक्रीवर तुम्हाला जर ३५ % कमीशन मिळत असेल तर अशा वस्तूसाठी तुम्ही स्वत:चा कष्टाचा पैसा खर्च कराल का? नक्कीच नाही
पण जर तीच वस्तू तुमच्या सोबतच्या लोकाना, मित्राना, मेव्हन्याला, मेव्हनीला, मामाला, मामाच्या मुलाला विकायची असेल तर ? तुम्हाला ३५% कमीशन आहे भाऊ !!


हेच तर घडतय. हे अशा प्रकारचे बेस्ट प्लॅन तुमच्याच जवळच्या लोकांकडुन येतात आणि तुमच्या कष्टाच्या पैशासह जीवनभरच्या सुखाला पारखे होता. तेव्हा सरळ म्हणा " नको ". कारण आजचा नको हा आयुष्यासाठी फ़ायद्याचा ठरु शकतो. जरी तुमच्या नात्याला थोडी ठेच लागली तरीही तुमच्या गळ्यात नकली प्रॉडक्टचा फ़ास पडण्यापासुन वाचाल.
मला खुप लोक भेटुन सांगतात की कसे नात्यातल्या लोकांनी नको नको म्हणतानासुध्दा विमा पॉलिसी गळ्यात घातली. कांही लोकांच्या वडीलांनीच सुरु केलीली विमापॉलिसी वारश्याने पुढे २०-२५ वर्षे चालवण्याचे काम त्यांच्यावर येउन पडले आहे.

५) गुंतवणुकीमधुन अवास्तव परताव्याची अपेक्षा करणे

अमेरिकेत बॅकेच्या FD (फ़िक्सड डिपॉझिट) वर १-२ % व्याज मिळते तर आपल्याकडे ८ - ९ %. त्या तुलणेत शेअर मार्केटमधुन १२-१५% रिटर्नस आल्यास चांगलेच म्हटले पाहिजे पण कांही लोक असे भेटले की अमूक एका मित्राने एका वर्षात १० लाखाचे २० लाख केले आणखी एकाने २ लाखाचे ३ लाख केले मग तुमचा सल्ला द्या - मी कोणता शेअर्स घेउ ? आता बोला !!!

मुलांचे शिक्षण आणि रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी १०-२० वर्षासाठी म्युच्युअल फ़ंडात SIP करणे पुरेशी आहे. ५०% आणि १००% परताव्यासाठी दरवर्षी झगडण्याची गरज नाही.

६) स्वत:ला स्पेशल समजणे
मला कोणताही आजार होणार नाही कारण मी जन्मजातच आरोग्यपुर्ण आहे. किंवा मी गाडी व्यवस्थीत चालवितो म्हणुन मला अपघात होणारच होणारच नाही असा चूकीचा गैरसमज लोकांच्यात असतो. त्यामूळे हे लोक आरोग्यविमा आणि अपघातविम्यापासून दूर राहतात.

७) दूरदृष्टीचा अभाव

लोक लांबचा विचार करत नाहीत आणि कांही करायला तयार होत नाहीत. वाढत्या महागाईत २०-२५ वर्षांनंतर एका लग्नाचा खर्च किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च किती असेल? घरखर्च किती येईल याचा अंदाज ते बांधू शकत नाहीत. आज जर घरखर्च महिणा १०,०००/- रुपये असेल तर २५-३० वर्षांनी तो दरमाही लाखाच्या घरात असेल. आज ३ लाखात होणारे लग्न २० वर्षानी १५ - २० लाखातही होणार नाही याची जाणीव फ़ार कमी लोकाना आहे.

८) खुपसारी देणेदारी असणे

लोकांनी "सुलभ मासिक हप्त्यात " या ब्रिदवाक्याखाली खुपसा-या गोष्टी घेउन ठेवल्यात उदा. डब्बल डोअर फ़्रिज, मोठे टिव्ही, अलिशानफ़र्निचर पासुन २ बीएचके - ३ बीएचके फ़्लॅटपर्यंत आणि आता त्याच्या हप्त्यांच्या जंजाळातून लहान सहान गोष्टीसुध्दा करताना नाकी नऊ येत आहे. छोट्यामोठ्या सहली, आईवडिलांना स्वत:सोबत ठेवणेही आता अवघड होऊन बसले आहे. कारण फ़क्त "सुलभ मासिक हप्त्यात " मिळणा-या गोष्टी.

आणि वरच्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे - अर्थिक साक्षरतेचा अभाव.


jagoinvestor या ब्लॉगवरुन साभार