Common
Mistakes in Personal Finance
प्रिय मित्रांनो, खालीलपैकी एक तरी चूक कधी ना कधी, कळत न कळत आपल्याकडून होत असते
१) गरजेशिवायचा अतिरिक्त खर्च करणे
हे तुमच्याकडुन नकळत होते. उदा. तुम्ही एक जाहीरात बघता 100 Megapixel चा कॅमेरा ज्यात 2000 पट optical zoom ची फ़ॅसिलिटी आहे. किमतीवर २०% सुट आणि ”मासिक सुलभ हप्त्यावर उपलब्ध” असे कळताच आपल्यातला फोटोग्राफ़र जागा होतो. किंवा ५२ इंची LED TV वर १५% डिस्काउंट, सोबत होमथिएटर फ़्री अशी जाहिरात बघताच आपल्याला जाणवू लागते कि आपली जूनी टिव्ही आता ब्लर दिसते आहे आणि तिला बदलायची वेळ आली आहे. मग काय अशी खरेदी नकळतच होवुन जाते.
(प्लिज इथे Financial Planning म्हणजे काहिंच खर्च न करणे असा घेउ नका. आपल्या स्वप्नांना आणि गरजाना योग्य न्याय देणे Financial Planning चाच एक भाग असते)
२) पत्नी आणि मुलासोबत आर्थिक नियोजनाबद्दल चर्चा न करणे
कुटुंबातील जवळपास सर्वाना कमवणा-याची कमाई माहीत असते पण खर्चाचा रकाणा कोण बघत नाही. विमा, होमलोनचे हप्ते, मुलांचे शिक्षण, लग्ने, रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आपण काय करता ते सर्वाना माहीत असावे. तेव्हा सर्वाना भविष्याच्या नियोजनात सामिल करुन घ्या.
३) गुंतवणुकीबाबत असमतोल असणे
कोणातरी एजंटच्या सांगण्यावरुन एखाद्या फ़ॉर्मवर सही केली की कांही लोकांचे टॅक्स प्लॅनिंग संपते. . . मग कालांतराने अशा लोकांच्या बॅंक खात्यात लाखो रुपये पडुन असतात. एफ़डीची मुदत संपली की नवीन करणे म्हणजेच आर्थिक नियोजन असे होवून बसते. शेवटी शेवटी कळते की शेअर मार्केटमधे फ़ायदा आहे. बघुया काय होते? असे म्हणुन १०-१५ हजार रु गुंतवायचे आणि १ वर्षात डब्बल व्हायची वाट बघायची. . .
याच्या विरुध्द कांही लोक ना बॅंकेत एफ़डी करतात ना पीपीएफ़ ते स्वत: शेअर ट्रेडींग करतात कधी यांची रक्कम १० वरुन १५ लाख होते तर कधी १५ वरुन ८ लाख, पुन्हा ८ वरुन १२ होते. असे करता करता कालांतराने तिथेच असतात.
गुंतवणुकीचा हिस्सा योग्य प्रमाणात ज्या ठिकाणी असायला हवा तिथे नसल्यामूळे दोघांचेही आर्थिक नियोजन फ़सते. योग्य सल्लागार निवडण्याचे टाळले की "चान्स" निघुन जातो.
४) जवळच्या लोकांकडुन येणा-या गोष्टी स्विकारणे
जर एखाद्या नकली वस्तू विक्रीवर तुम्हाला जर ३५ % कमीशन मिळत असेल तर अशा वस्तूसाठी तुम्ही स्वत:चा कष्टाचा पैसा खर्च कराल का? नक्कीच नाही
पण जर तीच वस्तू तुमच्या सोबतच्या लोकाना, मित्राना, मेव्हन्याला, मेव्हनीला, मामाला, मामाच्या मुलाला विकायची असेल तर ? तुम्हाला ३५% कमीशन आहे भाऊ !!
हेच तर घडतय. हे अशा प्रकारचे बेस्ट प्लॅन तुमच्याच जवळच्या लोकांकडुन येतात आणि तुमच्या कष्टाच्या पैशासह जीवनभरच्या सुखाला पारखे होता. तेव्हा सरळ म्हणा " नको ". कारण आजचा नको हा आयुष्यासाठी फ़ायद्याचा ठरु शकतो. जरी तुमच्या नात्याला थोडी ठेच लागली तरीही तुमच्या गळ्यात नकली प्रॉडक्टचा फ़ास पडण्यापासुन वाचाल.
मला खुप लोक भेटुन सांगतात की कसे नात्यातल्या लोकांनी नको नको म्हणतानासुध्दा विमा पॉलिसी गळ्यात घातली. कांही लोकांच्या वडीलांनीच सुरु केलीली विमापॉलिसी वारश्याने पुढे २०-२५ वर्षे चालवण्याचे काम त्यांच्यावर येउन पडले आहे.
५) गुंतवणुकीमधुन अवास्तव परताव्याची अपेक्षा करणे
अमेरिकेत बॅकेच्या FD (फ़िक्सड डिपॉझिट) वर १-२ % व्याज मिळते तर आपल्याकडे ८ - ९ %. त्या तुलणेत शेअर मार्केटमधुन १२-१५% रिटर्नस आल्यास चांगलेच म्हटले पाहिजे पण कांही लोक असे भेटले की अमूक एका मित्राने एका वर्षात १० लाखाचे २० लाख केले आणखी एकाने २ लाखाचे ३ लाख केले मग तुमचा सल्ला द्या - मी कोणता शेअर्स घेउ ? आता बोला !!!
मुलांचे शिक्षण आणि रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी १०-२० वर्षासाठी म्युच्युअल फ़ंडात SIP करणे पुरेशी आहे. ५०% आणि १००% परताव्यासाठी दरवर्षी झगडण्याची गरज नाही.
६) स्वत:ला स्पेशल समजणे
मला कोणताही आजार होणार नाही कारण मी जन्मजातच आरोग्यपुर्ण आहे. किंवा मी गाडी व्यवस्थीत चालवितो म्हणुन मला अपघात होणारच होणारच नाही असा चूकीचा गैरसमज लोकांच्यात असतो. त्यामूळे हे लोक आरोग्यविमा आणि अपघातविम्यापासून दूर राहतात.
७) दूरदृष्टीचा अभाव
लोक लांबचा विचार करत नाहीत आणि कांही करायला तयार होत नाहीत. वाढत्या महागाईत २०-२५ वर्षांनंतर एका लग्नाचा खर्च किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च किती असेल? घरखर्च किती येईल याचा अंदाज ते बांधू शकत नाहीत. आज जर घरखर्च महिणा १०,०००/- रुपये असेल तर २५-३० वर्षांनी तो दरमाही लाखाच्या घरात असेल. आज ३ लाखात होणारे लग्न २० वर्षानी १५ - २० लाखातही होणार नाही याची जाणीव फ़ार कमी लोकाना आहे.
८) खुपसारी देणेदारी असणे
लोकांनी "सुलभ मासिक हप्त्यात " या ब्रिदवाक्याखाली खुपसा-या गोष्टी घेउन ठेवल्यात उदा. डब्बल डोअर फ़्रिज, मोठे टिव्ही, अलिशानफ़र्निचर पासुन २ बीएचके - ३ बीएचके फ़्लॅटपर्यंत आणि आता त्याच्या हप्त्यांच्या जंजाळातून लहान सहान गोष्टीसुध्दा करताना नाकी नऊ येत आहे. छोट्यामोठ्या सहली, आईवडिलांना स्वत:सोबत ठेवणेही आता अवघड होऊन बसले आहे. कारण फ़क्त "सुलभ मासिक हप्त्यात " मिळणा-या गोष्टी.
आणि वरच्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे - अर्थिक साक्षरतेचा अभाव.
jagoinvestor या ब्लॉगवरुन साभार
No comments:
Post a Comment